‘मुले कुठेही, केव्हाही, कुणाही बरोबर असू देत, त्यांना चित्रकथांचीच धुंद असते. चित्रकथा (कॉमिक्स) मुलांचा मानसिक, वैचारिक आणि चारित्र्यगत अधःपात करतात. चित्रकथा मुलांचे मन, बुद्धी आणि सगळे व्यक्तित्वच अपंग, एकाकी, संवेदनाहीन, रुक्ष बनवतात. त्या मुलांची धारणा `जीवनात कोणतीही समस्या, अडचण येताच पॅन्टम वा सुपरमॅन पापणी लवताच दूर करील’, अशी होते. त्यामुळे ते वास्तवापासून दूर जातात आणि त्यांचे पाय भूमीवर ठरत नाहीत. धैर्य, साहस असलेला तो काल्पनिक शक्तीशाली मुलांचा आदर्श होतो. वास्तवात तो नसतो, हे सत्य मुले स्वीकारूच शकत नाहीत. याचबरोबर चित्रकथांची भाषा अश्लील, भोंगळ आणि व्याकरणदृष्ट्याही शुद्ध नसते. चित्रकथांमध्ये वाक्यांचे प्रमाण अल्प आणि चित्रांचे प्रमाण अधिक असते. चित्रांवरूनच मुले कल्पना करतात. त्यांच्यामध्ये स्वतंत्रपणे कल्पना करणे वा चिंतन करण्याची क्षमताच नसते. त्यांची दृष्टीद्वारा ग्रहणक्षमता क्षीण होत जाते.
आपण मुलांना पुराणातल्या कथा का नाही देत वाचायला ? त्यामुळे त्यांचे ज्ञान वाढेलच, त्याचबरोबर त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासही होईल. मुलांत साहस, धैर्य येईल. त्यांच्यात कुतुहलता आणि जिज्ञासा वाढेल. त्यांचे मन सागरासारखे विशाल होईल.
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जून २००९)